महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत शेतकऱ्या साठी पिक कर्ज तसेच विविध नाविन्य पूर्ण योजन राबवण्यात येत आहेत त्याचा ग्राहकांनी फायदा घ्यावा असे अव्हान बँकेचे अहमदनगर रिजनल मॅनेजर शैलेंद्र सिन्हा यांनी केले.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अहमदनगर ऑफिसचे रिजनल मॅनेजर शैलेंद्र सिन्हा यांनी जामखेड शाखेला भेट देऊन पिक कर्ज रिन्युल केल्याचे फायदे शेतकर्यांना कसे होतात ते सांगितले तसेच नविन्य पूर्ण योजनाचा फायदा घेण्याचे आव्हान केले व शाखेच्या कामकाजाची चौकशी करून मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्या समवेत राहुरी फॅक्टरी चे शाखा प्रबंधक आशोक बाचकर जामखेड शाखेचे मंगेश पाटील उपशखा प्रबंधक चंद्रकांत काळे पाटोदा शाखेचे कॅशियर गणेश शेटे विनोद घायतडक साकत पिंपळवाडी कोहेवाडी मोहा येथील शेतकरी उपस्थित होते .
यावेळी त्यांनी एच . यु . गुगळे पतसंस्था व समृद्धी मिल्क अँन्ड मिल्क प्रॉडक्टची पाहणी केली.
दिव्यांग ज्येष्ठसाठी त्रास कमी करण्याचा प्रयत्न
सध्या सेंट्रल बँक दुसऱ्या मजल्यावर असल्याने
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया जामखेड शाखेचे नवीन इमारतीची स्थंलातर होणार आहे त्याची पाहणी करून लवकरच नविन ठिकणी सुरु होईल त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी होईल असे सांगितले